सातारा : गिर्यारोहणातील महत्त्वाचे
आव्हानात्मक समजले जाणारे
कळसुबाई शिखर सातारा शहरातील
आठ महिलांनी सर केल. विशेष
म्हणजे या आठ जणींमध्ये एक दहा
वर्षाची आणि एक बारा वर्षाची
अशा दोन मुलींनी या मोहिमेत
यशस्वी सहभाग घेतला.
येथील डॉ. मृणालिनी कोळेकर
यांनी साताऱ्यातील महिलांसाठी
कळसुबाई ट्रेकचे संयोजन प्रथमच
आयोजित केले होते. साधारणतः
५,४०० फूट उंच असलेल्या
कळसूबाई शिखरावर चढाईसाठी
साधारणतः चार ते पाच खड्या
उभ्या शिड्या लावण्यात आल्या
आहेत. या महिलांनी सहा तासांत
शिखर सर करून महिला पुन्हा
पायथ्याशी आल्या. विशेष म्हणजे
या सर्व महिलांनी वयाची चाळीशी
त्यातील ओलांडलेली आहे.
मनीषा मगर यांना शारीरिक समस्या
असतानाही आव्हान म्हणून त्यांनी
ही कामगिरी पूर्ण केली. त्यांच्या
दोन ते तीन शस्त्रक्रिया झाल्या
आहेत. त्या नोकरी करतात
त्यांनीही ही मोहीम सर केली.
मोहिमेहून आल्यावर सकाळी त्या
आपल्या नोकरीवर रुजू झाल्या.
महिलेने आयोजित केलेला आणि
सातारा शहरातून प्रथमच महिलांचा
ग्रुप या मोहिमेसाठी गेला होता.
मृणालिनी कोळेकर, मनीषा मगर
यांच्यासह योग प्रशिक्षक डॉ.
सुचेता नीलेश माने, भार्गवी मार्के
(वय ११), डॉ. प्रेमलता भूपेश
भोसले, सान्वी महेंद्र कदम (वय
१३), सौ. शर्मिला पाटील, योग
शिक्षक व आहारतज्ज्ञ डॉ. तनया
केतन टंकसाळे यांनी या मोहिमेत
सहभाग घेतला.
कळसुबाई ट्रेकची वैशिष्ट्ये:
साताऱ्यातून प्रथमच एक महिला ऑर्गनायझर नी महिलांसाठी आयोजित करून गेलेला कळसूबाई ट्रेक या ट्रेकची पहिलीच बॅच या सर्व महिला म्हणजेच अष्टभगिनी.
सर्व महिला 40 ते 50 वयोगटातील
मुली 10 व 11 वर्षे वयाच्या
यात आणखी विशेष बाब म्हणजे सहावारी साडीत सौ. मृणालिनी कोळेकर या स्वतः यांनी हा प्रयत्न सक्सेसफुल केला, आणि डॉ. मनीषा मगर या वेगवेगळ्या फिजिकल सर्जरी झालेल्या, तसेच गुडघ्यात दोन वेळा पाणी झालेल्या 50 वर्षाचा महिला असून आव्हानात्मक हा ट्रेक पूर्ण केला.
या अष्टभगिनींनी अवघ्या सहा तासात कळसुबाई ट्रेक सर करून पायथ्याशी सुखरूप परत आल्या.
